शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

ंशाहूनगरीत सलोखा कायमच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:01 IST

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत सामाजिक सलोख्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला आहे; परंतु यामुळे येथील सलोख्यावर कोणताही परिणाम झाला नसून, तो जिवंत आहे. हा सलोखा इथून पुढेही कायम ठेवू, असा निर्धार सर्व पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी येथे व्यक्त केला. लवकरच दलित संघटना व हिंदुत्ववादी संघटनांचा ...

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत सामाजिक सलोख्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला आहे; परंतु यामुळे येथील सलोख्यावर कोणताही परिणाम झाला नसून, तो जिवंत आहे. हा सलोखा इथून पुढेही कायम ठेवू, असा निर्धार सर्व पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी येथे व्यक्त केला. लवकरच दलित संघटना व हिंदुत्ववादी संघटनांचा मेळावा घेऊन गैरसमज दूर करण्यात येतील, असे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांनी सांगितले.सामाजिक सलोखा कायम ठेवून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालय येथील पोलीस उद्यान येथे सद्भावना मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थितीहोती. या मेळाव्यात शाहूंच्याभूमीतील सलोखा कायम टिकवून ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरची सामाजिक सलोख्याची वीण घट्ट असल्याच्या भावना व्यक्त केल्या.यावेळी महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, रिपाइं (ए)चे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रिपाइं (गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, ‘पीआरपी’चे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, शहराध्यक्ष महेश उरसाल, ब्लॅक पॅँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई, राष्टÑवादी कॉँग्रेसचे आर. के. पोवार, कॉँग्रेसचे सुरेश कुराडे, ‘भाकप’चे नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, मल्हार सेनेचे बबन रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, बाळासाहेब भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी आभार मानले.महाराष्टÑातील सामाजिक एकतेची वीण अत्यंत घट्ट आहे. त्यामुळे ही वीण विस्कटण्याचा प्रयत्न करणाºयांना त्यात कधीच यश मिळणार नाही. खूप मेहनतीने या देशाला अखंड ठेवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला आहे. त्यामुळे सर्वजण गुण्या-गोविंदाने नांदूया. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अप्रिय घटना भविष्यात घडू नयेत यासाठी दक्ष राहूया.-चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीनवीन वर्षाची सुरुवात वाईट घटनेने झाली. अशा घटना परत होऊ नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सद्भावना मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून एकात्मतेची बीजे रोवली जातील.- विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलीस महानिरीक्षक